विचारधन स्टेटस इन मराठी | Vichardhan status in Marathi | vichardhan quotes in Marathi.

विचारधन स्टेटस इन मराठी /  Vichardhan status in Marathi / vichardhan quotes in Marathi.

विचारधन-स्टेटस-इन-मराठी
विचारधन स्टेटस इन मराठी

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे.आपल्या नवीन पोस्ट vichardhan quotes in Marathi,मध्ये.आपण आपल्या मित्र मैत्रिणी आई-वडील बहिण-भाऊ आणि इतर सर्व मित्र मैत्रिणींना तुम्ही शेअर करू शकता म्हणून यापोस्टमध्ये,Vichardhan status in Marathi,Vicharatan SMS Marathi,Vichardhan message Marathi,घेऊन आलो आहोत त्याच्या साह्याने तुम्ही तुमच्या WhatsApp Instagram,Facebook,SMS-message,पाठवू व शेअर करू शकता 🙏 धन्यवाद🙏


🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

अनुभवाने एक शिकवण

दिली आहे,

कुणाच्या चुका उणिवा

शोधत बसू नका..

नियती बघून घेईल

हिशोब तुम्ही करू नका…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

अलेक्झांडरने एक एक 

करून जग जिंकले,

पण मृत्यू जवळ असताना 

त्याने इच्छा व्यक्त केली की,

“मेल्यावर मला जमिनीत पुरताना

 माझे हात बाहेरच ठेवा,

कारण अख्या जगाला कळू दे की,

संपूर्ण जग जिंकणारा जाताना मात्र रिकाम्या हातानेच गेला

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

अशा माणसाला कधीच गमावू नका,

ज्याच्या मनात तुमच्याविषयी,

आदर, काळजी आणि प्रेम असेल…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

असं काम करा की,

नाव होऊन जाईल..

नाही तर,असं नाव करा की,

लगेचकाम होऊन जाईल…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

आजोबांनी दिलेला एक सल्ला,

सुरुवातीची २० वर्षे परिश्रम करून,

७० वर्षे आयुष्य आनंदात घालवले पाहिजे,

नाहीतर २० वर्षे आनंदात घालवून,

शेवटी ७० वर्षे कठीण परिश्रम 

करावे लागतात…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

आनंदापेक्षाही मोठा असा

एक आनंद आहे..

तो त्यालाच मिळतो,

जो स्वतःला विसरून

 इतरांना आनंदित करतो

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

आनंदी राहण्याचा सरळ 

साधा एकच उपाय आहे,

“अपेक्षा”स्वत:कडूनच ठेवा

 समोरच्याकडून नको…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

आपण आपल्या

स्वतःबद्दल कधी वाईट

विचार करू नका कारण,

देवाने या कामाचा ठेका

नातेवाईक आणि शेजारच्यांनी

देऊन ठेवलाय…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

आपला जन्म होतो तेव्हा आपण 

रडत असतो आणि लोक हसत असतात,

मरतांना आपण असं मरावं की 

आपण हसत असू आणि लोक रडत असतील

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

आपले दुःख मोजक्या १% 

माणसांपाशीच व्यक्त करा,

कारण ५०% लोकांना त्याची 

काही पर्वा नसते,

आणि ४९% लोकांना तुम्ही 

अडचणीत आहात याचाच आनंद होतो…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

आपले सौख्य हे आपल्या 

विचारांवर अवलंबून असते…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

आपल्या आयुष्यात,

एखाद्या व्यक्तीला आपली 

‘गरज’ बनवू नका…!!

कारण जेव्हा ते बदलतात,

तेव्हा तुम्हाला त्या व्यक्तीचा राग

कमी पण स्वतःचा जास्त राग येतो…!!

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

आयुष्य म्हणजे खेळ नव्हे,

फुकट मिळालेला वेळ नव्हे,

आयुष्य एक कोडे आहे,

सोडवाल तितके थोडे आहे,

म्हणूनच आयुष्यात येऊन

माणसे मिळवावीत,

एक-मेकांची सुख दुःखे

 एक-मेकांना कळवावीत…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ,

चांगली पाने मिळणे,

आपल्या हातात नसते..

पण मिळालेल्या पानांवर

चांगला डाव खेळणे,

यावर आपले यश अवलंबून असते…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

आयुष्यात एकदा तरी,

“वाईट” दिवसांना सामोरे गेल्याशिवाय,

“चांगल्या” दिवसांची किंमत कळत नाही…!

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

आयुष्यात कोणत्याही मुलीचा

हात धरायला,

हिम्मत लागत नाही..

हिम्मत लागते ती,

तोच हात शेवटपर्यंत

धरून ठेवायला…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

आयुष्यात तुम्ही किती 

आनंदी आहात,

ते महत्वाचं नाही..

तुमच्यामुळे किती जण 

आनंदी आहेत,

याला महत्व आहे…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

आयुष्यात नेहमी स्वतःचे स्वप्न 

पूर्ण करण्यासाठी काम करा,

 नाहीतर?दुसरा कोणीतरी 

तुम्हाला त्याचे स्वप्न पुर्ण 

करण्यासाठी कामाला ठेवेल”

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

आयुष्यातला सर्वात मोठा 

अपराध हाच असतो की,

आपल्यामुळे कुणाच्या तरी 

डोळ्यात अश्रु असणे,

आणि आयुष्यातले सर्वात 

मोठे सार्थक हेच की,

आपल्यासाठी कुणाच्या तरी 

डोळ्यात अश्रु असणे,

अश्रु तेच असतात पण फरक 

जमीन आसमानचा असतो…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

आयुष्यातले काही क्षण

 हे एकांतात

घालवत जा,सर्व प्रश्नांची उत्तरं

 तिथेच मिळतीलकारण,

तिथेच आपला संवाद फक्त

आणिफक्त स्वतःशी होतो…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

आयुष्यातल्या असंख्य समस्यांची,

फक्त दोनच कारणे असतात,

एकतर आपण,

विचार न करता कृती करतो,

किंवा कृती करण्याऐवजी,

फक्त विचारच करीत बसतो…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

आयुष्यातील सर्वात सोपा नियम:

जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटते,

ते इतरांसोबत करू नका…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

आवड आणि

आत्मविश्वास

असेल तर कोणतीही

गोष्ट अवघड नाही…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

इच्छा किती विचित्र गोष्ट आहे,

पूर्ण झाली नाही तर क्रोध वाढतो,

आणि पूर्ण झाली तर लोभ वाढतो…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

एकदा अर्जुन ने श्री कृष्णाला सांगितले:

भिंतीवर काहीतरी असे लिहा की,

आनंदात वाचले तर दु:ख होईल,

आणि दु:खात वाचले तर आनंद होईल…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

प्रभु श्री कृष्णाने लिहिले:

“ही वेळही निघुन जाईल”

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

एकदा भगवंताला एका भक्ताने विचारले,

“देवा” तूच हे सर्व निर्माण करणारा आहेस, 

मला निर्माण करणाराही तूच आहेस.

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

“तुला काही अर्पण करावे तर काय 

अर्पण करावे?

तुझेच तुला कसे अर्पण करणार?”

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

भगवंताने स्मित उत्तर दिले,

 “बाळा, तुझा अहंकार मी 

निर्माण केलेला नाही.

तो तूच निर्माण केलेला आहेस.

 तो मला अर्पण कर, त्याने अवघा

 संसार सुखाचा होईल.”

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

एकमेका साहय्य करू, 

अवघे धरू सुपंथ…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

एकमेकांविषयी

बोलण्यापेक्षा,

एकमेकांशी बोलण्याने

वाद मिटतात…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

ऐकणं महत्वाचं आहेच,

पण त्यापेक्षाही महत्वाचं आहे ते

आचरणात आणणं..

किती ऐकलं यापेक्षा आचरणात

किती उतरवलं, यावरच माणसाचं

यशापयश अवलंबून असतं…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

कडू औषध आपण लगेच गिळून टाकतो,

पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो,

असंच आयुष्यातले वाईट क्षण लगेच विसरा,

आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

कधी कधी आपण ज्यांच्यावर

 खूप प्रेम करतो तीच माणसं 

आपल्यापासून फार दूर जातात…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

कधी कधी संकटे आली की,

२ पावले माघे सरकनेच हिताचे असते,

वाघ २ पावले माघे सरकतो तो माघे

 हटण्यासाठी नव्हे,

तर पुढे झेप घेण्यासाठी,

जो काळाचा रोख पाहून माघे सरकतो,

तोच काळाच्याही पुढे जाऊ शकतो…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

कर्तव्य, कर्ज, उपकार

या ती गोष्टींचं

कधीच विस्मरण

होऊ देऊ नये…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

किती त्रास द्यावा एखाद्याला,

यालाही काही प्रमाण असते,

आपल्यावरूनच विचार करावा,

समोरच्यालाही मन असते…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

किती दिवसाचे आयुष्य असते,

आजचे अस्तित्व उद्या नसते,

मग जगावं ते हासून-खेळून,

कारण या जगात उद्या काय होईल,

ते कुणालाच माहित नसते…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

कुणाच्याही दुःखाचा

अनादर करू नये..

प्रत्येकजण आपापल्या

संकटांशी झगडत असतो..

काहींना आपल्या वेदना 

लपवता येतात,काहींना नाही…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

कुणी कितीही त्रास द्यायचा 

प्रयत्न केला तरी,

त्रास करून घ्यायचा की नाही

हे आपल्याच हातात असते

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

केवळ ज्ञान असून उपयोग नाही, 

ते कसं आणि केव्हा वापरायचं 

याचंही ज्ञान हवं…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

कोणत्याही मनुष्याची सध्याची 

स्थिती पाहून,

त्याच्या भविष्याची टर उडवू नका..

कारण,

काळ इतका ताकदवान आहे कि,

तो एका सामान्य कोळशालाही

हळू हळू हिऱ्यात बदलतो…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

कोणी कौतुक करो वा टीका

 लाभ तुमचाच आहे,

कौतुक प्रेरणा देते,

तर टीका सुधरण्याची संधी देते…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

कोणीतरी बर्फाला विचारले,

आपण एवढे थंड कसे?

बर्फाने अगदी छान उत्तर दिले,

माझा भूतकाळ पण पाणी आणि

 भविष्यकाळ पण पाणीच!

मग मी गरम कोणत्या गोष्टीवर होऊ?

आयुष्य खूप सुंदर आहे एकमेकांना

 समजून घ्या आणि जीव लावा…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

खूप सुंदर प्रश्न आणि त्या प्रश्नाचे उत्तर:

आयुष्य म्हणजे काय?

उत्तर :- माणूस जेव्हा जन्माला येतो,

तेव्हा त्याला “नाव” नसते पण “श्वास” असतो

आणि,

ज्यावेळी तो मरतो तेव्हा फक्त

“नाव” असते पण “श्वास” नसतो.

“नाव” आणि “श्वास” यांच्या मधील

 अंतर म्हणजेच,“आयुष्य”!

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

खोटं बोलणाऱ्या,फसवणाऱ्या,

व अपमान करणाऱ्या,

लोकांमध्ये राहण्यापेक्षा एकटं

राहिलेलं बरं…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

गरजेनुसार जीवन जगा इच्छेनुसार नाही,

कारण गरज तर गरीबांची पूर्ण होते,

इच्छा ही श्रीमंत जरी असला तरी अपूर्णच राहते…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

गरिबी असूनही दान करतो 

तो ख्ररा दानशूर…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

चिंता हा कुठल्याही दुःखावरचा 

उपाय होऊ शकत नाही…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

चुकीच्या निर्णयामुळे

आपला अनुभव वाढतो..

आणि योग्य निर्णयामुळे आत्मविश्वास…

म्हणून निर्णय बरोबर कि चूक

याचा विचार करायचा नाही,

निर्णय घ्यायचा आणि पुढे जायचं…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

छोट्या या आयुष्यात,

खूप काही हवं असतं,

पण पाहिजे तेच मिळत नसतं,

असंख्य चांदण्यांनी भरुन सुद्धा,

आपलं आभाळ मात्र रिकामं असतं…

हव्या असलेल्या सगळ्याच गोष्टी,

माणसाला मिळत नसतात,

पण न मिळणाऱ्या गोष्टीच,

माणसाला का हव्या असतात…?

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

जग नेहमी म्हणते,

चांगले लोक शोधा आणि,

वाईट लोकांना सोडा..

पण भगवान श्रीकृष्ण म्हणतात,

लोकांमध्ये चांगले शोधा व,

वाईट दुर्लक्षित करा कारण,

कोणीही सर्वगुण संपन्न

जन्माला येत नाही!

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

जग भित्र्याला घाबरवते आणि 

घाबरवणाऱ्याला घाबरते…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

जगाला काय आवडते ते करू नका,

तुम्हाला जे वाटते ते करा,

कदाचित उद्या तुमचे वाटणे,

जगाची “आवड” बनेल…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

जगू शकलात तर चंदनासारखे जगा, 

स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

जिंकलेल्या क्षणी हरवलेल्या प्रतिस्पर्ध्याला

कमी लेखणारे भरपूर आहेत…

पण हरलेल्या क्षणी पाठीशी

उभे राहणारे किती…?

यावरून माणसाची श्रीमंती कळते…

तुमच्या पाठीशी किती जण आहेत हे मोजण्यापेक्षा..

तुम्ही किती जणांच्या पाठीशी आहात

याला महत्व आहे!

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते,

त्यांचा तिरस्कार कधीच करू नका,

कारण ती व्यक्ती स्वतःपेक्षा तुम्हाला 

उत्कृष्ट व्यक्ती समजून जळत असते…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

जीवनात काहीच

कायमस्वरूपी नसते..

नाही चांगले दिवस,

नाही वाईट दिवस…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

जीवनात चांगला माणूस होण्यासाठी,

एवढेच करा…

चुकलं तेव्हा माफी मागा,

आणि कुणी चुकलं तर माफ करा..

आपला दिवस आनंदात जावो…

आणि मन प्रसन्न राहो!

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

जीवनात तीन प्रकारच्या लोकांना 

कधीच विसरायचे नाही,

१) ज्यांनी तुम्हाला तुमच्या

 अडचणीच्या वेळी मदत केली

२) ज्यांनी तुमच्या अडचणीच्या 

वेळी पळ काढला आणि

३) ज्यांनी तुम्हाला अडचणीत आणले

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे,

ज्या गोष्टीला लोक म्हणतात की,

हे तुला कधीच जमणार नाही…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

जीवनात सुख दुःख दोन्ही

आपण स्वीकारलेच पाहिजेत,

कारण ती आपणच

निर्माण केलेली आहेत..

हे सूत्र लक्षात घेतले तर,

मनुष्य सरळ वागू शकेल…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

जे घाईघाईने वर चढू 

पाहतात ते कोसळतात…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

जेव्हा काही लोक आपली फक्त 

गरज लागल्यावर आठवण काढतात,

तेव्हा वाईट वाटून घेऊ नका उलट गर्व करा,

कारण एका मेणबत्तीची आठवण फक्त 

अंधार झाल्यावरच येते..

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत 

त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात,

तो कधीही एकटा नसतो…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

झाकलेल्या मुठीतून वाळूचा कण 

निसटावा तसं हळू हळू आयुष्य

 निघून चाललंय…आणि,

आपण उगीच भ्रमात आहोत 

कि आपण वर्षा वर्षाने मोठे 

होत चाललोय,प्रेम “माणसावर”

 करा त्याच्या “सवयींवर” नाही,

“नाराज” व्हा त्याच्या बोलण्यावर 

पण “त्याच्यावर” नाही,

“विसरा” त्याच्या “चुका” 

पण त्याला नाही,कारण 

“माणुसकी” पेक्षा मोठं 

काहीच नाही…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

झोपेत पडलेली स्वप्ने,

कधी खरी होत नसतात,

पण ती स्वप्ने खरी होतात,

ज्यासाठी तुम्ही झोपणे

 सोडून देतात…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

ठेविले अनंते तैसेचि राहावे 

चित्ती असू द्यावे समाधान!

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

तलवारीच्या जोरावर मिळवलेलं 

राज्य तलवार असते तोवरच टिकतं..

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

ताकदीची गरज त्यांनाच लागते,

ज्यांना काही वाईट करायचे असते,

नाही तर जगात सर्व काही मिळवायला 

फक्त प्रेमच पुरेसे असते,

कारण प्रेमानेच जग जिंकता येते…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

तुमचा जन्म गरीब घरात झाला 

हा तुमचा दोष नाही,

पण तुम्ही गरीब म्हणूनच मेलात 

तर तो तुमचाच दोष आहे…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत

 असेल तर आधी तुम्ही वाईट 

आहात यावर विश्वास ठेवा..

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

तुम्ही जसे आहात तसेच

समोरच्या व्यक्तीने असावं,

अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही..

कारण एकत्र चालायचे म्हणून,

तुम्ही कधीच दुसऱ्या व्यक्तीचा

उजवा हात तुमच्या उजव्या हातात

घेऊ शकत नाही…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

दुसऱ्याचे अनूभव जाणून घेणे

 हाही एक अनुभवच असतो…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

दुसऱ्यासाठी डोळ्यात

पाणी आलं कि समजावं,

आपल्यात अजुन

माणुसकी शिल्लक आहे…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

दोष लपवला की तो मोठा होतो 

आणि कबूल केला की नाहीसा होतो…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

ना कुणाशी स्पर्धा असावी,

ना कुणाचा द्वेष असावा,

ना कुणाच्या पुढे जाण्याची 

आकांक्षा असावी,

ना कुणाला कमी लेखण्याची 

गुर्मी असावी,फक्त स्वतःला 

सिद्ध करण्याची जिद्द असावी…!!

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

नियती जेव्हा तुमच्या हातून

 काही हिरावून घेते,

तेव्हा त्यापेक्षाही काही 

मौल्यवान देण्याकरिता,

तुमचा हात रिकामा करीत असते…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

निवड संधी आणि बदल या 

तीन सोप्या पण महत्वाच्या गोष्टी,

संधी दिसताच निवड करता आली 

तर आपोआपच बदल होतो,

संधी समोर दिसुनही ज्याला

 निवड करता येत नाही

त्यांच्यात कधीच बदल होत नाही…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

नेहमी लक्षात ठेवा..

आपल्याला खाली 

खेचणारे लोक,

आपल्यापेक्षा खालच्या 

पायरीवर असतात…!

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

पाप ही अशी गोष्ट आहे जी 

लपवली की वाढत जाते…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

प्रत्येकाशी प्रेमानेच वागले पाहिजे,

जे आपल्याशी वाईट वागतात,

त्यांच्याशीही प्रेमानेच वागले पाहिजे,

ते चांगले आहेत म्हणून नाही,

तर आपण चांगले आहोत म्हणून…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, 

पण शत्रू निर्माण करू नका…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

प्रार्थना म्हणजे ईश्वराच्या 

जवळ जाण्याची शक्ती…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

प्रेम आणि विश्वास, 

कधिच गमावु नका..

कारण,“प्रेम प्रत्येकावर 

करता येत नाही..”

आणि,“विश्वास प्रत्येकावर

 ठेवता येत नाही..”

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

प्रेमळ माणसं ही,

इंजेक्शन सारखी असतात,

ते तुम्हाला कधी वेदना देतीलही,

पण उद्देश तुमची

काळजी घेणं हाच असतो…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

प्रेमाने जोडलेली चार माणसे,

आणि त्यासाठी लागणारे 

दोन गोड शब्द,

हे वैभव ज्याच्या जवळ 

आहे तोच खरा श्रीमंत…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

फुलपाखरु फ़क्त १४ दिवस जगते,

पण ते प्रत्येक दिवस आनंदाने 

जगून कित्येक ह्रदय जिंकते,

आयुष्यात प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे,

तो आनंदाने जगा आणि प्रत्येक 

ह्रदय जिंकत रहा…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

बोलून विचार करण्यापेक्षा,

बोलण्या-आधी विचार केलेला बरा…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

भूख आहे तेवढे खाणे ही प्रकृती,

भूख आहे त्यापेक्षा जास्त खाणे ही विकृती,

आणि वेळे प्रसंगी स्वतः उपाशी राहून,

दुसऱ्याची भूख भागविणे हिच खरी संस्कृती…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

भूतकाळ सतत डोक्यात ठेवला तर,

आपण आपला वर्तमानकाळ बिघडवत असतो..

म्हणून जुन्या झालेल्या चुका विसरून,

पुन्हा नव्याने कामाला लागलं पाहिजे…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

भूतकाळाच्या आठवणीत रमून,

भविष्याची चिंता करणे

याला मूर्खपणा म्हणतात…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

महत्वकांक्षा असल्याशिवाय

 माणूस मेहनत करत नाही,

आणि मेहनत केल्याशिवाय

 महत्वकांक्षा पूर्ण होत नाही…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

माणसाच्या मुखात गोडवा,

मनात प्रेम,

वागण्यात नम्रता,

आणि हृदयात गरिबीची जाण,

असली की, बाकी गोष्टी

आपोआप घडत जातात…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

माणूस स्वतःच्या चुकांसाठी 

उत्तम वकील असतो,

परंतु दुसऱ्यांच्या चुकांसाठी

 सरळ न्यायाधीशच बनतो…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

मोलाचे बोल:

जीवन चहा बनवण्यासारखे आहे..

अहंकाराला उकळू द्या,

चिंतांना वाफ होऊन उडून जाऊ द्या,

दुखणं विरघळून जाऊ द्या,

चुकांना गाळून घ्या आणि,

सुखाच्या आनंदाचे घोट हसत हसत घ्या…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

यशस्वी लोक आपल्या 

निर्णयाने जग बदलतात,

आणि अपयशी लोक जगाच्या 

भीतीने आपले निर्णय बदलतात…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

या जगात कुणीही आपला मित्र किंवा,

शत्रू म्हणून जन्माला येत नाही..

आपली वागणूक, आपला दृष्टीकोन आणि आपली नाती,

यावर ठरते कोण आपले मित्र किंवा शत्रू…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

योग्य निर्णय घ्यायचे,

तर हवा अनुभव..

जो मिळतो,

चुकीचे निर्णय घेऊनच!

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

रात्र नाही स्वप्नं बदलते,

दिवा नाही वात बदलते,

मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी,

कारण नशीब बदलो ना बदलो,

पण वेळ नक्कीच बदलते…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

विश्वास एखाद्यावर

 इतका करा की,

तुम्हाला फसवतांना ते 

स्वतःला दोषी समजतील…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

विश्वास ठेवा,

आपण जेव्हा कोणासाठी

काही चांगलं करत असतो,

तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी

काही चांगलं घडत असतं..

इतकंच की ते आपल्याला आता

दिसत नसतं…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

संकटं टाळणं माणसाच्या 

हाती नसतं पण संकटाचा

 सामना करणं त्याच्या हातात असतं…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

संयम राखणे हा आयुष्यातला

 फार मोठा गुण आहे…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

समजवण्यापेक्षा समजून घेण्यामधे

खरी परीक्षा असते,

कारण समजवण्यासाठी 

अनुभवाचा कस लागतो,

तर समजुन घेण्यासाठी 

मनाचा मोठेपणा लागतो…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

सरकारी बसमध्ये बसायला – नको,

सरकारी शाळेत शिक्षण – नको,

सरकारी दवखाण्यात उपचार – नको,

मुलीला मात्र नवरा फक्त…

“सरकारी नोकरीवालाच पाहिजे”

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

स्वतःचा बचाव करण्याचं

सर्वात प्रभावी साधन म्हणजे,

समोरच्यावर टीका करणं…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

स्वतःच्या हिमतीवर

मेहनत करून जगण्यात

जी मजा आहे ती इतर

कशातच नाही…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

हसण्याची इच्छा नसली तरी,

हसावे लागते..

कसे आहे विचारले तर,

मजेत म्हणावे लागते..

जीवन एक रंगमंच आहे,

इथे प्रत्येकाला नाटक करावे लागते…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे, 

मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची!

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

“लक” – या शब्दात दोन अक्षरे आहेत,

“भाग्य” – या शब्दात अडीच अक्षरे आहेत,

“नशीब” – या शब्दात तीन अक्षरे आहेत,

“किस्मत”- या शब्दात साडेतीन अक्षरे आहेत,

पण हे चारही शब्द,“मेहनत”

या शब्दांपेक्षाही लहान आहेत…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

“हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत,

पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो…

आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो,

“नाही” लवकर बोलल्यामुळे,

आणि,“हो” उशिरा बोलल्यामुळे…

🙏🌺🤔💮🤔🌸🤔🌼🤔🌸🤔💮🤔🌺🙏

Final word:

मित्रांनो आजची आमची पोस्ट vichardhan status in marathi तुम्हाला कशी वाटली हे कंमेंट करून सांगायला विसरू नका.आणि पोस्ट आवडली असल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणी बरोबर share करायला विसरू नका.

मित्रांनो आम्ही तुमच्यासाठी असेच चांगले चांगले स्टेटस घेऊन येणार आहोत असंच तुमचा सपोर्ट ठेवा.


धन्यवाद मित्रांनो


Post a Comment

1 Comments